रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट; अपघात की कट?, उच्चस्तरीय चौकशी सुरू

    29-Oct-2024
Total Views | 79
grp-rpf-start-investigation
 

मुंबई :       रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये झाल्याची घटना दुपारी ४.२० च्या सुमारास घडली. दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रेन नियोजित वेळेनुसार जिंदहून दिल्ली रवाना झाली. सांपला स्टेशनहून पुढे खरखोडा आणि रोहाड दरम्यान पोहोचताच मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे डब्ब्यातून प्रवाशांना ठिणग्या येताना दिसल्या. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.




दरम्यान, रोहतकमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत लोको-पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा स्फोट अपघात होता की सुनियोजित कट याचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

दरम्यान, मागील काही काळात वाढत्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. स्फोटाची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून रेल्वे अधिकारी आणि पोलिस विभागाशी संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचले. ही घटना अपघात की कटकारस्थान याचा उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सल्फर आणि पोटॅश गॅसचा वापर करण्यात आला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121