कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा

    27-Oct-2024
Total Views | 560
 
Waqf Board
 
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवरुन वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थानात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की जमीन एका दर्ग्याच्या मालकीची असून २००५ मध्ये वक्फ कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती. ब्रिटीश काळापूर्वीच्या या जामिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे असल्याचे कानिफनाथ मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे.
 
मंदिराचे विश्वस्त श्री हरी आंबेकर यांनी सांगितले की, ही जमीन पूर्वी शंकर भाई यांच्या पत्नी बिबन यांना सेवेसाठी दिली होती. यानंतर २००५ साली काही स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी वक्फ कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करुन ही जमीन वक्फच्या नावावर नोंदवली असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
 
 
 
कानिफनाथ मंदिर पाडून त्याचे दर्ग्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरू असता हा वाद आणखी चिघळला आहे. हे प्रकरण वक्फ न्यायाधिकरणाकडे पाठवण्यात आले. त्यांनी कानिफनाथ मंदिराच्या रचनेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत १९ मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी येण्यापासून रोखवण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121