राहुल गांधी आरक्षण संपवू पहातायतं! महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांना धडा शिकवावा!

25 Oct 2024 18:19:08

sanjay nirupam
 
( Image Source : ANI ) 
 
मुंबई : ( Sanjay Nirupam )शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेसच्या फेक नरेटिव्ह विषयी भाष्य केले.
 
ते म्हणाले, "काँग्रेसचा दुटप्पीपणा हळूहळू उघडकीस येत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेसने एनडीए सरकार आरक्षण रद्द करणार आहे आणि संविधान बदलणार आहे, अशी चुकीची माहिती देणारी मोहीम चालवली होती. वास्तविकता अशी आहे की मुळात काँग्रेसच आरक्षणाच्या विरोधात आहे, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपुष्टात आणू असे वक्तव्य केले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या विधानाचे समर्थन केले होते आणि त्यांच्या समाजाला आरक्षणाचा फायदा होतो. त्यांना त्यांचा नेता जास्त आवडतो. मला आशा आहे की महाराष्ट्रातील जनता या निवडणुकीत काँग्रेसला त्यांच्या चुकांची शिक्षा नक्की देईल."
 
 
 
Powered By Sangraha 9.0