८५ विमान कंपन्यांना पुन्हा धमक्या

25 Oct 2024 17:33:39
 
airlines
 
नवी दिल्ली : काही दिवसांपासून विमान कंपन्यांवर बॉम्ब हल्ले करणार असल्याच्या धमक्या देण्याचे काम सुरूच आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी ८५विमान कंपन्यांना लक्ष करण्यात आल्याची माहिती आहे. उदयपूर ते दिल्लीला जाणाऱ्या विमानांवर हल्ला करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. यामधील आकासा विमान कंपनीच्या २५ विमानांना लक्ष केले आहे.
 
इंडिगो विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ६ ई ८७ कोझिरकोड ते दम्माम, ६ई २०९९ उदयपीर ते दिल्ली इस्तंबूल, ६ ई ५८ जेद्दा ते मुंबई, ६ ई १७ मुंबई ते इस्तंबूल अशी उड्डाणे करणारी विमाने लक्ष करण्यात आली आहेत.
 
गेल्या १२ दिवसांत, भारतीय वाहकांना चालवलेल्या २७५ हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या होत्या अशा अनेक बातम्या येत आहेत. यामुळे विमान कंपन्यांचे ६०० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
गुरूवारी केंद्राने सोशल मीडियावर मेटा आणि एक्स ट्विटर माध्यमातून विमान कंपन्यांना फसव्या बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याप्रकऱणात नेमकं कोण आहे याची शोधमोहिम सुरू आहे.
 
सरकार अलर्ट मोडवर
 
याचपार्श्वभूमीवर आता सरकार अलर्ट मोडवर आहे. विमानांना सोशल मीडिया, मेलद्वारे धमक्या देणाऱ्यांना आणि प्रवासात व्यत्यय आणणाऱ्यांना नो- फ्लाय यादीत टाकता येईल का, असा विचार करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय याचा पाठपुरावा करेल असे सांगण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0