मुंबई : ( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेला गुंता सुटण्याचे काही नाव नाही. जवळपास महिनाभर चर्चेच्या फेर्या झडल्यानंतर अखेर बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी त्यांना केवळ २५५ जागांवरील फॉर्म्युला जाहीर करता आला. त्यानुसार, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या वाट्याला प्रत्येक ८५ जागा येणार आहेत.
याविषयी माहिती देताना संजय राऊत आणि नाना पटोले म्हणाले, तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. सध्या ८५-८५-८५ चे ठरले आहे. एकूण २७० जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. गुरुवारी त्याबाबत स्पष्टता येईल.
उबाठाकडून परस्पर यादी जाहीर
महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा झाल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन फॉर्म्युल्यावर भाष्य करण्याचे ठरले होत मात्र, त्याआधीच उबाठा गटाने ६५ उमेदवारांची यादी परस्पर जाहीर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे, संजय केळकर यांच्याविरोधात राजन विचारे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर, वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.