सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकारकडून योजना; अंतरिम बजेटकडे देशाचे लक्ष

31 Jan 2024 22:00:31
Government of India Various Schemes for Citizens
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील युवा आणि सर्वसामान्य, गरीबांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यात येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतरिम बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार आहेत. अंतरिम बजेट सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील चार प्रमुख घटकांकरिता म्हणजेच तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्या विकासासाठी सरकारकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, उदाहरणादाखल देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आधुनिक व नैसर्गिक प्रकारांबाबत सांगण्यात येत असून ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात घट येईल. सर्वसामान्यांना घर, पाणी, वीज, रस्ता यांसारख्या पायाभूत सुविधा सरकारकडून उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच, विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर, देश, लाल समुद्रातील राजनैतिक संघर्ष यांमुळे जग महागाईसारख्या प्रश्नांना सामोरे जात असताना भारताला याची झळ बसलेली नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावेळी सांगितले.


Powered By Sangraha 9.0