लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी श्रीरामांवर आणि राम मंदिराच्या उभारणीवर वादग्रस्त विधाने केली आहेत. यापुर्वीही त्यांनी हिंदु देवतांचा आणि सनातन धर्माचा अवमान करणारी वक्तव्ये केली आहेत. मंगळवारी, २३ जानेवारीला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या शताब्दी सोहळ्यात सपा नेत्यांच्या उपस्थीतित ते बोलत होते.
मौर्य यांनी यावेळी रामलला प्राणप्रतिष्ठेबाबत असभ्य आणि आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या आहेत. त्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठेला ढोंगी आणि दिखाऊपणा म्हटले आहे. जर प्राणप्रतिष्ठा करून दगड जिवंत होतो, तर प्राणप्रतिष्ठा करून मृत शरीर का चालू शकत नाही? इथे ढोंगीपणा, दिखावा आणि दिखाऊपणा आहे. अस त्यांनी म्हटल आहे.
यापूर्वीही स्वामी प्रसाद मौर्य २२ जानेवारी २०२३ ला आता करोडो लोक रामचरितमानस वाचत नाहीत, हे सर्व मूर्खपणाचे आहे. असेही म्हटले होते. स्वामी प्रसाद यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक आक्षेपार्ह ठरवून काढून टाकण्याची मागणीही सरकारकडे केली होती. आणि काही श्लोक काढणे शक्य नसेल तर पुर्ण पुस्तकच प्रतिबंधीत करा असे म्हटले होते.