"फिर एक बार मोदी सरकार! अबकी बार ४५ पार!", एकनाथ शिंदेंनी केली मोदींसमोर घोषणा
12 Jan 2024 17:55:38
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत शिवडी न्हावा शेवा सागरी सेतुचे १२ जानेवारीला उद्धाटन केले आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. याला अटल सेतु असे नाव देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक मानला जाणारा हा प्रकल्प आहे. यामुळे फक्त मुंबई ते नवी मुंबईच नव्हे तर मुंबई वरुन पुणे, कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळेची आणि ट्राफिकमुळे खर्च होणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे अस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटनानंतर अटल सेतुवरुन फेरी मारली आणि नंतर ते नवी मुंबईत सभास्थळी पोहोचले. यावेळीही त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थीत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधीत केले.
"शिवडी न्हावा शेवा सागरी सेतुला अटलजींसारख्या अटल आणि कणखर व्यक्तीचे नाव आणि आपल्या यशस्वी पंरप्रधानाच्या हातुन त्याचे उद्घाटन हीच या सेतुच्या मजबुतीची गॅरंटी आहे. ज्याप्रकारे देशात मोदींची गॅरंटी चालते तसाच हा सेतूही आता अधिक मजबुत होणार आहे" अस मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
"शिवडी न्हावा शेवा हा फक्त रस्ता नसून विजयाकडे घेऊन जाणारा विकास मार्ग आहे. विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. पण आम्ही विरोधकांचा विचार न करता काम करत पुढे जात आहोत. विरोधकांचा अहंकार संपुन अबकी बार ४०० पार फिर एक बार मोदी सरकार आणि महाराष्ट्रात ४५ पार होणार'' असही त्यांनी म्हटले आहे.