माता रमाबाई विश्राम कट्ट्याचे लोकार्पण
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध भागात नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी प्रभाग क्र. २२ (ब) मध्ये खारटन रोड येथे उभारलेल्या माता रमाबाई विश्राम कट्टाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्यासह भाजप तसेच भाजयुमो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.