२२ देशांशी द्विपक्षीय व्यवहार भारत रुपयातून करणार - निर्मला सितारामन
नवी दिल्ली:भारत हा इतर २२ देशांशी द्विपक्षीय व्यवहार रूपयातून करेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एनडीटीव्ही शी बोलताना सांगितले. '२२ देश आपल्याशी द्विपक्षीय रुपयांत करार होईल का यासाठी चर्चा करत आहेत.' असे त्या म्हणाल्या.
भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापकता वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करत आहे.दक्षिण आशियाई बँका Vostro Rupee अकाऊंटस मार्फत करन्सी एक्सचेंजसाठी सहकार्य करत आहेत. रिझर्व्ह बँकेने १८ देशातील बँकांना रुपयांत सेटलमेंट करण्यासाठी Special Vostro Rupee Account काढायची परवानगी दिली आहे.