मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे लव्ह आणि हेटचं नातं आहे. दोघांच्या बोलण्यात द्वेष आणि त्वेष दिसतो. देवेंद्र फडणवीसांकडून एवढे अपशब्द ऐकले नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा आहे. त्यांनी ते कमी करावं. त्या दोघांमध्ये मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरेंच्या बाजूने एक पिटिशन देण्यात आलं होतं. निरंजन डावखरेंनी निर्णय दिला आहे. विधानपरिषदेतला प्रतोदपदाचा निर्णय अजून झाला नाही. शिंदे गटाकडून विप्लव बजोरिया आणि ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांच नावं आहे. मात्र त्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही.अजित दादांकडून पत्र आलं आहे. गटनेता म्हणून कोणाला नेमावं? विधासभेत असं झालं म्हणून विधानपरिषदेत होईल असं नाही. मात्र आधी विधानसभा काय निर्णय देते, हे पाहावं लागेल." असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.