राजस्थानमध्ये परिवर्तन होणारच; फडणवीसांचा गेहलोत सरकारवर घणाघात!

12 Sep 2023 12:20:52
 
Fadnavis
 
 
जोधपूर: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेला जनतेचा ज्या प्रकारचा पाठिंबा मिळत आहे, त्यावरून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होणार आहे, हे निश्चित आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या राष्ट्रीय मंत्री अमृता रहाटकरही उपस्थित होत्या. राजस्थानमध्ये भाजपकडून चार वेगवेगळ्या परिवर्तन यात्रा काढल्या जात आहेत. हा प्रवास आता जैसलमेर, बारमेर, जालोर, सिरोही मार्गे पाली येथे पोहोचला आहे. १८दिवसांच्या ५१ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या प्रवासाचा समारोप जोधपूर शहरात होणार आहे.
 
विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "यावेळी राजस्थानच्या जनतेने मोदीजींसोबत सरकार येणार असल्याचे मनाशी बांधले आहे. काँग्रेस आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची पोकळ आश्वासने ज्या प्रकारे समोर येत आहेत, त्यामुळे यावेळी राजस्थानमध्ये बदल घडून येईल, असा पूर्ण विश्वास आहे." असं फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0