गेल्या दीड वर्षात ३८ अॅक्टिव फार्मास्युटिकलची भारतात निमिर्ती - मनसुख मंडाविया
नवी दिल्ली : पीएलआय (प्रोडक्शन लिंक इन्सेंटीव्ह) योजनेच्या माध्यमातून भारताने ३८ अॅक्टिव फार्मास्युटिकल इनग्रिडियंटस भारतात तयार केले गेले आहे.गेल्या दीड वर्षात परदेशी उत्पादन आयात न करता या वस्तू बनवल्या आहेत.असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.
'२०१७ मधील चीन बरोबर डोकलाम सीमावादा नंतर ऐक्टिव फार्मास्युटिकल पदार्थ भारतातच बनवून आत्मनिर्भरता आणण्याचे आव्हान होते.९५ टक्के आयात त्यावेळी चीनवर अवलंबून होती.पीएलआय योजनेमुळे या उत्पादनांची आयात न करता आपण उत्पादनासाठी सक्षम झालो आहोत.मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की गेल्या दीड वर्षात ,३८ एपीआय भारतात उत्पादित झाले आहेत.'असे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी आयआयएम अहमदाबाद येथील हेल्थकेअर समिट कार्यक्रमात बोलताना सांगितले.
मंडाविया यांनी बोलताना आत्मनिर्भरते बरोबर भारतात उत्पादनांसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट होण्याची मोठी गरज आहे असे सांगितले.हा कार्यक्रम हेल्थकेअर आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी आणि हेल्थकेअर तज्ञ यांच्या पॅनेल चर्चेसाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.