मुंबई : कंत्राटी कामगारांना बेस्टच्या कामगारांसारख्या सुविधा द्याव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा आदी विविध मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज बुधवार (२ ऑगस्ट) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम बेस्टच्या वाहतुकीवर झाला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. बेस्ट कंत्राटी कामगार चालक आणि वाहक यांनी केलेल्या संपामुळे आज मुंबईमधील बेस्ट वाहतुकीवर परिणाम झालेला आहे.
कामगारांच्या प्रशासनाकडे नेमक्या मागण्या काय ?
- बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा.
- बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, प्रत्येक बस मार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा.
- नादुरुस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा.
- मुंबईसाठी बेस्टचा स्वमालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० बसेसचा करा.