मुंबई : राज्य मंत्रीमंडळ बैठकीत गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅसिनो कायदा संबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. तर, केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आजच्या बैठकीतून मिळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
१. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
२. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
३. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
४. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
५. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
६. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
७. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
८. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन (विधी व न्याय विभाग )
९. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)