प्रकाश आंबेडकर यांनी ‘INDIA’ आघाडीत यावं: अशोक चव्हाण

17 Aug 2023 14:10:45
 
Ashok Chavan
 
 
मुंबई : प्रकाश आबंडेकर यांनी 'INDIA' आघाडीत यावं, ही मनोमन इच्छा असल्याचे माजी मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या आघाडीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष आहेत. या आघाडीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सामील व्हावं. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण आंबडेकर इंडियासोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
 
"तोडफोड करून उमेदवार देतात. घराणेशाही नाही असं म्हणतात. आमच्याकडे निवडून येणाऱ्याला उमेदवारी देणार आहोत. राज्यात भाजपने किती तोडफोड केली आहे. आमच्या नव्या आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. तुमच्यासोबतच्या 40 लोकांचा आधी काय तो निर्णय घ्या. जर तुमच्याकडे बहुमत आहे तर इतर पक्षातील नेत्यांची गरज का भासते?" असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
 
 
प्रकाश आबंडेकरांना मविआ नकोशी!
 
काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला महाविकास आघाडीसोबत काही देणंघेणं नाही. महाविकास आघाडीसोबत आमचा काही संबंध नाही. आमची युती केवळ ठाकरे गटासोबत आहे. पण आपला महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांआधी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर कोणतं पाऊल उचलणार? हे पाहावं लागेल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0