मुंबई : पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ संपल्यामुळे संसद १० ऑगस्टला भंग करण्यात आली. संसद भंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पाकिस्तानच्या सरकारला काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती करायची असते. पण आता पाकिस्तानमध्ये काळजीवाहू पंतप्रधानावरुन राष्ट्रपती आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात वाद सुरु झाला आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शहबाज शरीफ यांना पत्र लिहून १२ तारखे पर्यंत काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्त करण्यास सांगितले आहे. त्यावर शहबाज शरीफ यांनी राष्ट्रपतींवर टीका केली आहे. राष्ट्रपतींना एवढी घाई का आहे? असा प्रश्नही त्यांनी केला.
पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूका घेण ही फक्त औपचारिकता आहे. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता पाकिस्तानच्या सैन्याच्याच हातात आहे. आताही पाकिस्तानी सैन्याचा शहबाज शरीफ यांना पूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही तीन वर्षासाठी तुरंगात टाकण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोणाचा विजय होणार आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही.