मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड दि. २ जुलै रोजी घडली. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. म्हणून मी राजभवनात होतो. त्यामुळे आज अजित पवारांसोबत गावाखेड्यातील प्रत्येक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अजितदादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळेच गुरुपोर्णिमेला अजितदादाना मी भेटायला आलो आहे, असे मिटकरी म्हणाले.
तसेच संजय राऊतांनी अजित पवार भावी मुख्यमंत्री होतीस , असे विधान केले होते.त्या विधानाबद्दल बोलताना मिटकरी म्हणाले की, जर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर नक्कीच आनंद होईल. त्यामुळे पंढरपुरच्या पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो की, संजय राऊतांची इच्छा लवकर पुर्ण होवो. आणि त्यांच्या तोंडात बारामतीची साखर पडो, असे मिटकरी म्हणाले.