सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार!

25 Jul 2023 16:23:26
Maharashtra CM Eknath Shinde In Maharashtra Legislative Assembly

मुंबई
: राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्य सरकारकडून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मह्त्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील.

तसेच, राज्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात सदस्य प्रणिती शिंदे यांनी मुद्दा मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असून सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 






Powered By Sangraha 9.0