मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वेळ आली आहे. असं आदित्य ठाकरे म्हणआले होते. यावर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दादा भुसे म्हणाले, "प्रत्येकाने आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे.आपल्याला अजुन लांबचा प्रवास करायचा आहे. आपले अजुन दुधाचे दातही पडलेले नाहीत. त्यामुळे ज्याने त्याने आपल्या मर्यादेचे भान ठेवलं पाहिजे." असा सल्लाही दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर दादा भुसे म्हणाले की, आपण अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही. तसं काही होणार नसल्याचा दावाही भुसे यांनी केला.