लोकसभेत शिवसेनेला पाच जागाही मिळणार नाही : संजय राऊत

    26-May-2023
Total Views | 423

Sanjay Raut (1)

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

मुंबई  : शिंदेंच्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काहीही फरक पडत नाही. लोकसभेतील खासदारांचा आमचा आकडा १९ इतकाच राहील. शिंदे गट हा पक्ष नाहीच. त्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही विचारधारा नाही. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काही बैठका नाहीत. कुणी काहीही म्हणो आमचे लोकसभेतील बलाबल हे कायम राहील. या माझ्या वक्तव्यावर कुणी काहीही टीका केली तरीही आम्हाला काहीही फरक पडत नाही. शिवसेनेने २२ काय ४८ जागा जरी लढविल्या तरीही त्यांच्या पाचही जागा निवडून येणार नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
जागावाटपावरुन सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरूच आहे. यापूर्वी प्रत्येक पक्षाला १६ जागा देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, याला काँग्रेससह संजय राऊतांनी ठाकरे गट म्हणून विरोध केला होता. उद्धव ठाकरे गटाला आत्ताच्या महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील १ जागा अशा मिळून १९ जागा कायम ठेवायच्या आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. शरद पवारांनी याबद्दल सावध भूमिका घेत आम्ही जागावाटपासाठी बसू तेव्हा हा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनीही जागावाटपावरुन संजय राऊतांना सुनावले होते.



अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121