मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. अशी ओरड बॉलिवूड सिनेसृष्टीतून ऐकायला मिळते. परिणामी महिला केंद्रित चित्रपट फार कमी प्रमाणावर तयार होतात. त्यातही जे चित्रपट तयार होतात त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. द केरला स्टोरी हा चित्रपट भारतातील २०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला महिला केंद्रित चित्रपट असल्याचे समजते.
याबाबत भाष्य करताना अदा शर्मा या चित्रपटातील अभिनेत्रीने याबाबत भाष्य करणारी पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. ती म्हणते, "आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी नेहमीच अनपेक्षित असतात.. कारण कोणत्याही अपेक्षा मी या चित्रपटाकडून ठेवल्या नव्हत्या. हे घडवून आणल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!"
दरम्यान, या चित्रपटाने भारतातून केवळ तीन आठवड्यात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. पुढील काळात असे सामाजिक विषय घेऊन अनेक चित्रपट येईल हवेत अशी मागणी चाहत्यानाकडून आणि प्रेक्षकांकडून केली जाताना दिसते.