अजित पवार सोडून मला सर्वांचे फोन आले : जयंत पाटील

ईडी चौकशीनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

    23-May-2023
Total Views |
 
Jayant patil
 
 
मुंबई : ईडी चौकशीनंतर सर्व मित्रपक्षाच्या प्रमुखांचा मला फोन आला होता. अजित पवारांचा मला फोन आला नाही. अशी प्रतिक्रिया ईडी चौकशीनंतर जयंत पाटील यांनी दिली. ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. दरम्यान, त्यांनी भेटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईडीच्या चौकशीनंतर कुणाकुणाचा फोन आला, अजितदादांचा आला होता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
 
त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, "नाही, मला अजितदादांचा फोन नाही आला." असं स्पष्टपणे सांगितलं. IF & LS कंपनी घोटाळा प्रकरणी ईडीकडून काल जयंत पाटील यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यांच्या चौकशीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन त्यांना आला नाही. त्यावर जयंत पाटील यांनी नाराजीचा सुर व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.