नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दि. १३ मे रोजी इतर धर्मातील लोकांनी प्रवेश केला होता. याच त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून राज्यात बरेच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर आपल्याला प्रतिक्रिया दिल्या. या प्रकरणामुळे वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वकतव्याचा आचार्य तुषार भोसले यांनी समाचार घेतला. " १०० वर्षापुर्वीपासून ही परंपरा चालू असल्याचे राऊतांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान आचार्य तुषार भोसलेंनी ठाकरे नेते संजय राऊत यांना दिले. तसेच ' राऊतांकडे याचे पुरावे नसतील तर राऊतांनी हिंदू धर्म सोडला हे जाहीर करावं!' असं खुलं आव्हान तुषार भोसलेंनी दिले.
आचार्य तुषार भोसले म्हणाले, गावकऱ्यांनी स्वाक्षरी सुरू केली आहे की आमच्याकडे अशी कोणतीही परंपरा नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी यानिमित्ताने दाखवून दिले की स्वार्थी राजकारणासाठी ते इतके लाचार झाले आहेत की त्यांनी स्वतःच्या धर्माशी गद्दारी केली असल्याची टीका आचार्य तुषार भोसलेंनी केली.