मुंबई : आरबीआयने २ हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय दि.१९ मे रोजी जाहीर केला होता. त्यांनतर आता आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी यानिर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली. " आम्ही आमच्या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे स्पष्ट केले आहे की, २ हजार रुपयांच्या नोटा प्रामुख्याने तत्कालीन प्रचलित १ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची कायदेशीर निविदा स्थिती असताना सिस्टममधून बाद केल्यानंतर केल्या जाणाऱ्या पैशाचे मूल्य त्वरीत भरून काढण्यासाठी जारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता २ हजारांच्या नोटांसंबंधी छपाईबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरबीआयचा तत्कालीन निर्णय ज्या हेतूने घेतला गेला होता तो उद्देश पूर्ण झाला आहे, तसेच, चलनीकरणात इतर मूल्यांच्या पुरेशा नोटा चलनात आहेत. आरबीआयने स्पष्ट केल्याप्रमाणे २ हजार रुपयांच्या नोटांचे चलन ६ लाख ७३ हजार कोटींवरून ३ लाख ६२ हजार कोटींपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे, २ हजारांच्या नोटांची छपाईही बंद करण्यात आली आहे. एकंदरीत. २ हजारांच्या नोटा ज्या उद्देशाने छापण्यात आल्या तो उद्देश पूर्णत्वास गेला असल्याचे आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.