मुंबई : गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे एक बोट दुर्घटना घडली आहे. ४० जणांना घेऊन जाणारी एका बोट पलटून अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. बुडालेल्या इतर लोकांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे. हे सर्व प्रवाशी दशक्रिया विधीसाठी आले होते.