गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून ४ जणांचा मृत्यू!

22 May 2023 12:39:11
 
Ganga river ghat
 
 
मुंबई : गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे एक बोट दुर्घटना घडली आहे. ४० जणांना घेऊन जाणारी एका बोट पलटून अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. बुडालेल्या इतर लोकांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे. हे सर्व प्रवाशी दशक्रिया विधीसाठी आले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0