मुंबई : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारविरोधात जनमत आहे असे वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या.तिथे निवडणुक घेऊ आणि मग ठरवू जनमत कोणाच्या बाजूने आहे, असे आवाहन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना केले होते. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी राजीनामा देईल पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभे करा, असे प्रति आव्हानच आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवारांना दिले आहे.
तसेच एकनाथ शिंदेंच घटनाबाह्य सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही, असा टोला ही आदित्य ठाकरेंनी लगावला. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दंगली झाल्या नाहीत, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.