मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पाहायला मिळत आहे. आर्यन खान प्रकरणासंबंधी त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्याच बरोबर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात संभाषण झाल्याची माहिती उघड झाली आहे. शाहरूख खानने मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचेही समीर वानखेडेंनी याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे आधीचे चार्जशीट बदलली गेल्याचा आरोप वानखेडेंनी याचिकेतून केला आहे. याआधी जे काही आरोप केले आहेत त्यात म्हटले आहे की आर्यन खानने जे मेसेज शाहरूख खानला पाठवले तेच मेसेज समीर वानखेडेंनी पाठवले याचा खुलासा त्यांनी याचिकेद्वारे म्हटले आहे.
दरम्यान, त्यातच आता समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर हिचे नाव समोर आले आहे. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी या प्रकरणी चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंचा पाय अधिक खोलात जाताना दिसत आहे.