शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नये : फडणवीसांचा इशारा

    08-Mar-2023
Total Views | 64
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. त्यांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.
 
"गुजरात सरकारने 350 कोटी रूपये कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मदत जाहीर केली. आपल्याहून लहान राज्य असूनही गुजरातला जे जमलं ते महाराष्ट्राला का जमू नय़े असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भारत सरकारने काहीही मदत केली नाही, शेतकरी हवालदिल झालाय असं ते म्हणाले." राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
 
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, "राज्यात 13 हजार 729 हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल. दुपारनंतर पुन्हा अडपेट माहिती घेऊन निवेदन केले जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. फेरीवाला धोरण अंमलबजावणी संदर्भात अहवाल ३ महिन्यात सादर करणार. मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यातील सर्व महापालिकांना आदेश देणार." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121