नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. दि. ३१ मार्च रोजी देशात ३ हजारपेक्षा जास्त रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. रूग्णवाढीमागे ओमिक्रॅानचा नवीन व्हेरिएंट XBB. १.१६ असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.
तसेच भारतात XBB.१.१६ ची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याने WHO ने या संबधी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. या व्हेरिएंटमध्ये ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १८४ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर रूग्ण बरं होण्याचा दर ९८.१४ टक्के येवढा आहे. रोज कोरोनांच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.