राऊतांचं दंगलीबाबत वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम!

30 Mar 2023 17:42:26
sanjay-raut-criticized-shinde-fadnavis-government-on-sabhajinagar-riots


मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दि.२९ मार्च रोजी दोनच्या सुमारास राडा झाल्याची घटना घडली. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.तसेच राज्यात अशांतता निर्माण करणं, हा या सरकारचा एकमेव हेतू आहे.त्यामुळेच दंगली होत आहेत, असे ही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान या घटनेवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, काही लोकांचा संभाजीनगरमधील परिस्थिती तणावपुर्ण करण्याचा मानस आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग दिला जात आहे. त्यामुळे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. त्यामुळे या घटनेचे राजकारण करू नये, असे ही फडणवीस म्हणाले. तसेच राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन फडणवीसांनी केले आहे. त्यावर संपुर्ण घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका राऊतांनी केली आहे.

 
Powered By Sangraha 9.0