संजय राऊतांच्या वक्तव्याचा विनाकारण कांगावा : सुनिल प्रभू

02 Mar 2023 10:53:56


संजय राऊतांच्या वक्तव्याचा विनाकारण कांगावा: सुनिल प्रभू
मुंबई : संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले ते निषेधार्ह आहेच. हक्कभंग आणण्याबाबत एकमत असताना देखील सभागृह तहकूब का केले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तर सुनिल प्रभू यांनी आक्रमक होत विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? असे म्हणत सत्ताधाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी केली.

सुनिल प्रभू म्हणाले, विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ म्हणाले की, बरे झाले देशद्रोह्यांसोबत मी चहापाणी घेतले नाही. विरोधकांना एक हक्क आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री अशाप्रकारे विरोधकांना देशद्रोही म्हणत असतील तर अध्यक्षांनी हे कसे सहन करतात? ज्या 12 कोटी जनतेने आम्हाला विरोधीपक्ष म्हणून याठिकाणी बसवले आहे त्या जनतेचाही हा अपमान आहे. विरोधकांना अशाप्रकारे देशद्रोही म्हणणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी." अशी मागणी देखील सुनिल प्रभू यांनी केली.

Powered By Sangraha 9.0