सीआयडीच्या निर्मात्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

    15-Mar-2023
Total Views | 148

cid 
 
मुंबई : सीआयडी मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे सिंगापूर येथे निधन झाले आहे. त्यांचे निधन हे कर्करोगानं झाले असून त्यावर ते बराच काळ उपचारही घेत होते. अनेक मुलाखतींतून शिवाजी साटम यांनी आपल्यासोबतच्या प्रदीप उप्पर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. काल त्यांनी शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टवरून ही माहिती त्यांनी जाहीर केली. सीआयडीसोबतच 'आहट', 'सतरंगी सुसराल', 'सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स' अशा काही लोकप्रिय मालिकांचीही निर्मिती केली होती. त्यांचा 'नेल पॉलिश' हा सिनेमा शेवटची निर्मिती असणारा ठरला.
 
आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी. ही मालिका आपल्या डोळ्यासमोर आली की 'कुछ तो गडबड हैं दया' हा डायलॉग आठवत असेलच. एसीपी प्रद्युम्न यांच्या तोंडातून बाहेर पडणारं हे वाक्य आपल्याला पाठही झालं असेलच. या मालिकेतली हरएक पात्र हे प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. परंतु ही जादू आपल्यापर्यंत पोहचवण्याचा विडा ज्यांनी उचलला त्या निर्मात्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
 
त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कलाकारांसोबतच चाहत्यांनाही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121