परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘ठाणे खाडीतील संशोधन’ या विषयावर डॉ. संजय जोशी यांनी मार्गदर्शन करत खाडीवर आजपर्यंत झालेल्या संशोधनांचा उहापोह केला. दुसर्या सत्रात डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी ’खाडी संवर्धनामध्ये अशासकीय संस्थांचा सहभाग’ या विषयावर आपले विचार मांडले. यानंतर विक्रोळीतील हेमंत कारखानीस यांनी ‘गोदरेज’ कंपनीच्या ‘गोदरेज मॅन्ग्रोव्हस अॅप्लिकेशन’विषयी माहिती दिली. परिसंवादाच्या तिसर्या सत्रात डॉ. प्रसाद कर्णिक यांनी प्रवीण कोळी, आकाश पाटील आणि मुकुंद केणी यांच्याशी कोळी बांधवांना भेडसावणार्या प्रश्नांवर चर्चा केली.
07 February, 2023 | 15:38
खाडीतील प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे त्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम, पूलबांधणी आणि काही ठिकाणी झालेल्या खारफुटीच्या वाढीमुळे त्यांना मासे कमी मिळणे, त्यांची पुढची पिढी मासेमारीपासून दूर जाणे आदी गोष्टींविषयी चर्चा झाली आणि कोळी बांधवांनी या प्रश्नांवर त्यांच्या परिने उपायदेखील सुचवले. डॉ. प्रणिता भाले यांनी महाविद्यालयातील ‘ग्रीन आर्मी’ विषयी माहिती सांगितली. यानंतर विद्याधर वालावलकर यांनी ‘जागतिक खारफुटी दिना’च्या अनुषंगाने दि. २६ जुलै रोजी ’पाणथळ भूमी पुनरुज्जीवन’ या विषयावर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रसाद कर्णिक यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन वैष्णवी जाधव आणि रुपाली शाईवाले यांनी केले.