नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जानेवारी या पराक्रम दिनी अंदमान-निकोबार द्वीप समूहातील सगळ्यात मोठ्या २१ निनावी बेटांचे नामकरण केले. या बेटांना देशाच्या २१ 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. ही २१ बेटे अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा भाग आहेत. या बेटांचे आजवर नामकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या बेटांबद्दल कोणालाही विशेष माहिती नव्हती. देशाची शान असलेली हि बेटे आजवर दुर्लक्षितच राहिली. पण केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता अंदमान-निकोबार द्वीप समूहातील २१ निनावी बेटे ही, देशाच्या 'परमवीरचक्र' विजेत्या वीर सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.
याआधी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील रॉस द्विपचे नाव बदलून 'नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप' असे नाव दिले आहे.
(निल द्वीप)
त्याचबरोबर निल द्वीपचे 'शहीद द्वीप' असे नामाकरण करण्यात आले होते.
(हॅवलॉक द्विप)
हॅवलॉक द्विपचे 'स्वराज द्वीप' असे नामकरण करण्यात आले.अंदमान-निकोबार द्वीप समूहातील निनावी बेटांना देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या सैनिकांची नावे देण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून, योग्य आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूहाला ऐतिहासिक महत्व आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटावर स्वातंत्र्य भारताचा तिरंगी ध्वज फडकवला होता. अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील २१ बेटांना देशाच्या ज्या २१ 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. त्या सैनिकांचे देशासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. पण भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना म्हणावा तसा सन्मान, आधीच्या सरकारांनी दिला नाही. परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. पण केंद्रातील मोदी सरकारने अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील निनावी बेटांना देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या वीर सैनिकांची नावे देऊन, देशाच्या परमवीर चक्र विजेत्या सैनिकांचा यथोचित सन्मान केला आहे. आज खऱ्या अर्थाने देशाच्या 'परमवीर चक्र' विजेत्या सैनिकांचा सन्मान झाला आहे.