आर्थिक नियोजन आणि मालमत्तेचे संरक्षण करताना गृहविम्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण, गृहविमा हा देखील तितकाच महत्त्वाचा. गृहविम्यामध्येच गुंतवणूक करणे पारंपरिक जोखीम व्यवस्थापनाशी निगडित असले, तरी कुटुंबाच्या भविष्यालासुरक्षितदेखील करते. अशा या गृहविम्याचे महत्त्व विशद करणारा हा लेख...
1. नैसर्गिक आपत्ती आणि अनपेक्षित घटनांविरोधात आर्थिक संरक्षण
गृहविम्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नैसर्गिक आपत्ती व अनपेक्षित घटनांसंदर्भात आर्थिक संरक्षण. आज जगामध्ये हवामान बदलामुळे वारंवार नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे. चक्रीवादळ, पूर, जंगलातील आग (वणवा) किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गृहविमा फायदेशीर ठरते. यामध्ये दुरूस्तीचा खर्च किंवा पुनर्निर्माणासाठी होणारा खर्चदेखील कव्हर केला जातो, ज्यामुळे घरमालकांना या महागड्या दुरूस्तीसाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत नाही.
2. चोरी किंवा घरफोडीसाठी कव्हरेज
चोरी, घरफोडी किंवा इतर दुष्कृत्यांमुळे होणार्या वैयक्तिक वस्तूंच्या नुकसानावर देखील गृहविमा संरक्षण देतो. याअंतर्गत घरमालक त्यांच्या नुकसानीचा आकडा ‘रिकव्हर’ करू शकतात आणि चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा खरेदी करू शकतात. असे झाल्याने त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडत नाही.
3. दायित्व संरक्षण
गृहविमा दायित्व संरक्षण प्रदान करते. उदाहरणार्थ, तुमच्या घराच्या शेजारी आग लागली असेल किंवा तुमच्याच कुटुंबातील सदस्याचा किंवा तुमच्या मालमत्तेमधील थर्ड पार्टीचा अपघात झाला असेल, तर अशा स्थितीतही गृहविमा महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये वैद्यकीय खर्च व कायदेशीर शुल्क कव्हर करण्याची तरतूद आहे. यामुळे तुमच्या मालमत्तेचे संरक्षण होते आणि तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळते.
4. व्यापक संरक्षण
विमाकृत राशीमध्ये आपोआप वाढ होणे हे गृहविम्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. हे नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य वाढत्या महागाईच्या आव्हानाचे निराकरण करण्यासहमालमत्तेशी संबंधित वाढत्या खर्चासाठी संरक्षण देते. या वैशिष्ट्यासह तुमची विमाकृत राशी विद्यमान बाजारपेठ दरांनुसार काळासह आपोआप समायोजित होते, ज्यामुळे तुमच्या व पॉलिसीमध्ये तुमच्या घराची वास्तविक बदली किंमत दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे, या समायोजनामुळे प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, असे नाही. म्हणून गृहविमा घरमालकांसाठी त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजेच त्यांच्या घरांचे संरक्षण करण्यासाठी किफायतशीर व विश्वसनीय मार्ग आहे.
5. कुटुंबाचे संरक्षण व मन:शांती
आर्थिक पैलूंव्यतिरिक्त गृहविम्याचा बहुमूल्य फायदा म्हणजे त्यामधून मिळणारी मन:शांती. घरखरेदी करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि विम्याच्याच माध्यमातून घराचे संरक्षण म्हणजे तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित असल्याची एकप्रकारे खात्री मिळते.आजच्या काळात गृहविमा हा पर्याय घरमालकांसाठी म्हणूनच गरजेचा आहे. ही आर्थिक सुरक्षितता व मन:शांतीप्रती गुंतवणूक आहे, जी तुमचे घर, मालमत्ता व कुटुंबाचे अनेक जोखीमांपासून संरक्षण करते. गृहविमा अतिरिक्त खर्च असला तरी त्याचे फायदे खर्चापेक्षा अनेकपटीने जास्त आहेत. विमा उद्योगामध्ये होत असलेले बदल आणि तंत्रज्ञान सुधारणांसह गृहविमा घेणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे, यापेक्षा अधिक सुलभ यापूर्वी कधीच नव्हते. तुमची सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजेच तुमच्या घराचे आणि कुटुंबाच्या भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने गृहविमा सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
(लेखक ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे अंडररायटिंग हेड आहेत.)