मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.