सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. त्यासाठी ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व समस्या सोडवण्याची आम्हाला शक्ती दे, अशी प्रार्थना विठु माऊलीकडे केली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण दिंडीत भाग घेतला. तसेच फुगडीचाही आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "माऊली आपल्या सगळ्यांची प्रतिनिधी आहे. सर्व वारकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे माऊलींची सेवा करण्यासाठी आलो आहोत.
पुढे ते म्हणाले की, समस्या अनेक आहेत. या समस्या सोडवण्याची आम्हाला शक्ती द्यावी, आशिर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना आम्हाला पुर्ण करता यावा, हीच माऊलीकडे मागणी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.