"तुमच्या प्रतिभेचं, कर्तृत्वाचं प्रतिबिंब..."; भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

    20-Nov-2023
Total Views | 31

amitabh bachchcan 
 
मुंबई : एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची स्पर्धा संपली असून अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पराभव जरी झाला असला तरी प्रत्येक भारतीय सर्व क्रिकेटपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांच्या खेळाचे कौतुक सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या भावना समाज माध्यमावर पोस्ट करत व्यक्त होत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले असून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील तुम्ही खेळत राहा, अशी प्रोत्साहित करणारी पोस्ट अमिताभ यांनी केली आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी काय लिहिले?
 
“टीम इंडिया.. काल रात्रीचा निकाल हा तुमच्या प्रतिभेचे, कर्तृत्वाचे आणि योग्यतेचे प्रतिबिंब नाही.. आम्हाला तुमचा अभिमान आहे.. चांगल्या गोष्टी घडतील..तुम्ही खेळत राहा,” अशी त्यांनी एक पोस्ट केली आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये बिग बी म्हणाले, “तुमची प्रतिभा, क्षमता आणि योग्यता या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि खूप वर आहे. तुम्ही खेळलेल्या १० सामन्यांच्या निकालांनी हे दाखवून दिले की तुम्ही असा संघ आहात ज्यांनी इतरांना नमवलं. या विश्वचषकात तुम्ही किती माजी चॅम्पियन आणि विजेत्यांना हरवलं ते पाहा. तुम्ही सर्वोत्तम आहात आणि राहाल.”
 
 
 
 
ट्विटरसोबत अमिताभ बच्चन यांनी एक इन्स्टाग्रामवर पोस्टदेखील एक केली आहे. स्वतःचाच फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “नाही, नाही, नाही. टीम इंडिया तुम्ही अजुन बाहेर पडलेला नाहीत. तुम्ही आमचा अभिमान आहात. तुम्ही ते हृदय आहात जिथे आमचे हात टेकतात.”
 

amitabh bachchcan 
 
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट
 
“भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडलं….परंतु क्रिकेटमधील आमच्या लिगसीचा आम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे आभार…तुम्ही पूर्ण भारताला खूप आनंद दिला. तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आदर आहे.”
 
हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है!
 
तर अभिनेत्री काजोलनेही पोस्ट करत लिहिले आहे की, “हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! टीम इंडिया तुम्ही खूप चांगले खेळलात. आणखी एक वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा.” हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनी देखील भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीशी उभे राहात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121