मुंबई : भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, "वल्लभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलं गेलं आहे. सामना या ठिकाणी ठेवला भारतीय पक्ष सर्व आपल्याकडे श्रेय घेण्याचा विचार होता. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता. मात्र ज्या पद्धतीने निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्षाने दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरवलं. सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही.कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण. पडद्या मागचे राजकारण काल झालं भविष्यात त्याचं नक्कीच चर्चा होणार आहे. क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचे. पैसा घेऊन जायचा. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायच्या आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं हा यांचा डाव आहे." असं संजय राऊत म्हणालेत.