"बाबर भक्त काँग्रेस नेत्यांना अयोध्येत प्रवेश नाहीच" - हनुमानगढीचे महंत राजू दास

29 Oct 2023 12:46:18
 Mahant-Rajudas
 
लखनऊ : "काँग्रेस नेत्यांचे बाबरीवरील प्रेम कमी होत नाही हे दुर्दैवी आहे. ते स्वतः रामभक्त नसून परकीय आक्रमक बाबरचे भक्त असल्याचे वेळोवेळी सांगतात. अयोध्येतील संत अशा लोकांना कोणत्याही मंदिरात जाऊ देणार नाहीत." असा इशारा हनुमानगडीचे महंत राजुदास यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
 
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने बाबरीच्या ढाच्याला 'शहीद' म्हणून संबोधले, त्यानंतर संपूर्ण देशातील साधू-मुनी संतापले आहेत. अयोध्येचे महंत राजू दास यांनी या बाबर भक्तांना अयोध्येत येऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हे लोक रामाचे भक्त नसून परकीय आक्रमक आणि 'बलात्कारी बाबर'चे भक्त आहे.
 
ते म्हणाले की, "हे लोक सुरुवातीपासूनच राम मंदिराला विरोध करत होते. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरही ते म्हणाले होते की हे राम मंदिर अजून बांधू नका कारण त्याचा फायदा भाजपला होईल. हे लोक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता बोलत होते. बाबरने भारतातील लाखो मंदिरे उध्वस्त केली, आपल्या वेदशाळा नष्ट केल्या, आज त्याचा गौरव होत आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे, वेळ आली की ते मंदिर ते मंदिर फिरू लागतात. सनातन्यांनी अशा अनावृत्त आणि अनुकरणांपासून सावध राहण्याची गरज आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0