मुंबई : आयसीसी विश्वचषक २०२३ मधील महामुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे सुरू आहे. भारत या सामन्यात जिंकण्याची शक्यता जास्त वर्तविली जात आहे. यासामन्यासाठी सपाट खेळपट्टी तयार करण्यात आली असून फलंदाजी करण्यासाठी पीच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दरम्यान, दुसऱ्या इनिंगमध्ये खेळताना विशेषतः बॅटिंग करताना भारताला ड्यू फॅक्टरचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला सेकंड बॅटिंग करताना फारसे आव्हान नसेल. याआधी भारताने विश्वचषक सामन्यात आव्हानाचा पाठलाग करतानाचा चांगला रेकॉर्ड पाहायला मिळाले आहे.
तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने असतील. आतापर्यंत वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध नेहमीच अजिंक्य राहिली आहे. आता कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हाच रेकॉर्ड काय ठेवण्याचा प्रयत्न असेल.