मुंबई : जेव्हा जेव्हा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार, अन्याय आणि त्याला डिवचण्याचा आले तेव्हा मुंबईकरांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. जेव्हा जिहादी मानसिकता आपलं डोकं वर काढून हिंदूंना छेडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी मुंबईकर हिंदूंनी आपले सामर्थ्य दाखवले आहे, हा इतिहास आहे. या जनआक्रोश मोर्चानंतरही जर रोहिंग्ये, बांगलादेशी आणि समाज विघातक प्रवृत्तींनी जर आपल्या कारवाया थांबविल्या नाहीत, तर त्यांना मुंबईतून हाकलून देण्यासाठी मुंबईकर हिंदू सक्षम आहे, हे आज हिंदूंनी शांततेत काढलेल्या मोर्चातून दाखवून दिले आहे. मुंबईच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी तुम्हाला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, हा इशारा संदेश किंवा धमकी त्यांनी लक्षात घ्यावी, हे मी त्यांना ठणकावून सांगत आहे. भगव्या रक्ताची मुंबई हिंदूद्रोह्यांना उत्तर द्यायला सक्षम आहे!