अत्याचाराविरोधात जागृती करणे गरजेचे!

30 Jan 2023 16:52:10
Ashish Shelar


मुंबई
: आजच्या मोर्चात आम्ही केवळ हिंदू म्हणून सहभागी झालो आहोत. कुठलाही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय भूमिका या सहभागाच्या मागे नाही. लोकांनी सर्वप्रकारच्या भिंती तोडून एक हिंदू म्हणून पुढे येणे आता गरजेचे बनलं आहे आणि त्यासाठी हा मोर्चा नक्कीच मोठी भूमिका बजावेल. ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या दोन मुख्य मुद्द्यांवर मुंबईतील हिंदू समाज आक्रमक बनला असून त्यावर मोठी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या सर्व घटनांना रोखण्यासाठी आम्ही कायद्याची मागणी करत आहोत आणि तो कायदा नक्कीच होईल. हिंदूद्रोह्यांना हिंदूंची ताकद दाखवण्याची योग्य वेळ आली असून त्यांच्या अत्याचाराविरोधात समाजात जागृती करणे गरजेचे आहे.

- आ. अ‍ॅड. आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप




Powered By Sangraha 9.0