मुंबई : जेव्हा लोक कुठल्याही यंत्रणेशिवाय असा मोर्चा आयोजित करतात आणि जनतेचा त्याला पाठिंबा मिळतो, तेव्हा निश्चितच समाजात संतापाची आणि उद्वेगाची भावना असते. काही लोकांनी कथित हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्ववादाच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतली, त्याला कंटाळून हिंदू समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आम्हीदेखील हिंदू म्हणूनच या मोर्चात उपस्थित आहोत.
देशभरात ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यासारख्या घटनांच्या माध्यमातून महिलांना मुलींना टार्गेट करून, समाजाला टार्गेट करून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ‘सिमी’, ‘बामसेफ’सारख्या संघटना देशविघातक कृत्य करत आहेत, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आजच्या मोर्चाला कुठल्याही पक्षाची फूस नाही आणि त्यामुळेच हिंदू समाजाने आज मांडलेली भावना उत्स्फूर्त होती, हे वास्तव आहे. ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर कायदा आणण्याचे आमचे मानस असून तो कायदा भाजपचेच सरकार आणेल हा विश्वास आहे. आजचा ‘विराट मोर्चा’ पाहून जर या देशविरोधी शक्तींचे डोळे उघडले नाही, तर त्यांना जागीच ठेचल्याशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही.