मुंबई : सकल हिंदू समाज ‘जनआक्रोश मोर्चा’ या शीर्षकातून आजच्या हिंदूंची भावना काय आहे, हे निर्देशित होते. आज मुंबईत भूमाफियांच्या माध्यमातून होणारे अनधिकृत मशिदीचे बांधकाम, जागा हडपण्याचे उद्योग वाढू लागले आहेत. हिंदू मुलींना फूस लावून केले जाणारे धर्मांतरण आणि विरोध करणार्यांचे अपहरण, या सर्व बाबींमुळे सर्वसामान्य हिंदूंमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज व्यक्त झाला आहे.
समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि त्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी स्वतः समाज आता रस्त्यावर उतरला आहे. जेव्हा जनभावना आणि जनक्षोभ उसळून येतो. तेव्हा, राज्यात सरकार कुणाचे आहे, कुठला पक्ष राज्य करतोय, हा प्रश्न गौण ठरतो. आज जनतेची भावना महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, यासाठी तीव्र आहे. आम्ही या कायद्यांविषयी संवेदनशील असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात येईल, हे निश्चित आहे, असे विधान भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.