"हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे, राज्यातील तरुणांनी आता पेटून उठले पाहिजे"

15 Sep 2022 14:01:43

pawar
 
 
जळगाव : "वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्यामुळे राज्यातील दीड लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला" असा आरोप करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील तरुणांना या विरोधात पेटून उठले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गेला असा जो आरोप होतोय तोही खोटा असल्याचा दावा अजित पवारांनी केला . फॉक्सकॉनच्या जवळपास सगळ्याच मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या, त्यांनी महाराष्ट्रात येण्याचे जवळपास निश्चित केले होते, तरी त्यांनी तो प्रकल्प गुजरातला नेला असा आरोप केला.
 
राज्यातील विकासाची कामे पूर्णपणे ठप्प आहेत, राज्यातील मंत्री फक्त त्यांच्या वैयक्तिक स्वार्थसाठीच काम करतात आणि पक्ष पाहून काम करतात हे योग्य नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण त्या त्या जागेपुरतेच मर्यादित राहिले पाहिजे. इतरवेळी नको असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात लम्पी आजारामुळे जनावरांचे मृत्यू वाढत आहेत, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलून हा आजार आटोक्यात कसा आणता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी राज्य सरकरला दिला.
 
देशात आत नवीनच प्रथा सुरु झाली आहे फोडा फोडीची मला तर भाजपला प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची भूक तरी किती? तुम्हांला अजून किती हव्यास आहे? असे प्रश्न विचारात अजित पवारांनी गोव्यातील काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरावरून भाजपवर टीका केली.देशात कोणी विरोधकच शिल्लक राहिला नाही पाहिजे अशी घटक नीती भाजप अवलंबतंय त्याचे गंभीर परिणाम होतील अशी जोरदार टीका अजित पवारांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0