नवी दिल्ली: हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी भारतीय ध्वज प्रदर्शित किंवा फडकवण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदिनी हे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा मोहीम ही भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे.
चित्रांमध्ये दर्शविल्याप्रमाणे राष्ट्रध्वज दुमडावा आणि आदरपूर्वक संग्रहित करावा. सरकारने अलीकडेच भारतीय ध्वज योग्यरित्या कसा दुमडायचा याबद्दल एक मार्गदर्शक चित्र शेअर केले आहे. या मध्ये, लिहिले आहे की भारतीय ध्वज आडवा ठेवा. पांढऱ्या पट्टीच्या खाली केशर आणि हिरव्या पट्ट्या फोल्ड केल्याची खात्री करा. आता पांढरी पट्टी अशा प्रकारे फोल्ड करा की भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांसह फक्त अशोकचक्र दिसेल. दुमडलेला ध्वज हातात किंवा तळहातावर ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा.