७ देशविरोधी युट्युब चॅनल्सवर सरकारकडून बंदी

18 Aug 2022 17:50:12
youtube
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतात सध्या एक साधारण समाज असा झालेला दिसतो की भारतीय परंपरा, सामाजिक सलोखा, भारताची प्रतीके यांच्यावर चिखलफेक केली की लगेच प्रसिद्धी मिळते. लगेच भरपूर पैसे मिळायला सुरुवात होते. त्यामुळे आज सोशल मीडियावर असे असेक सोशल मीडिया पेजेस, चॅनेल्स धुमाकूळ घालताना दिसतात. त्यांच्या या खोट्या प्रचाराला भुलून अनेक लोक त्यांच्यामागे भुलतात पण सरकारी यंत्रणांच्या सजगतेने या अशा सोशल मीडिया अकाउंट्सना पायंडा घालायला सुरुवात झाली आहे. नुकतीच भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ७ युट्युब चॅनेल्स वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भारतविरोधी गरळ ओकणाऱ्यांना आता चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
 
 
 
 
 
 
लोकतंत्र TV, यु अँड व्ही TV, एएम रिझवी, गौरवशाली पवन मिथिलांचल, सी टॉप 5TH, सरकारी अपडेट , सब कुछ देखो ही बंदी घातलेल्या सात चॅनेल्सची नावे आहेत. या चॅनेल्सच्या बरोबरीने न्यूज की दुनिया या पाकिस्तानी युट्युब चॅनेललाही भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतीय सण - उत्सव, धार्मिक परंपरा, तसेच भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर सारखा संवेदनशील मुद्दा यासर्व गोष्टींवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत मजकूर व्हायरल करून देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवणे आणि लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करणे हा या सर्वच चॅनेल्सचा हेतू होता. त्यामुळे त्या चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पर्यंत या चॅनेल्सना ८५ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत तसेच त्यांची लोकप्रियता देखील जास्त आहे. या सर्व चॅनेल्सची सर्वच सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतविरोधी मजकूर पसरवण्यासाठी या चॅनेल्सनी नेहमी खोट्या, बेकायदेशीर मार्गांनी मिळवलेल्या मजकूराचाच आधार घेतल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
 
 
 
२०२१ सालच्या माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या नियमांनुसार देशाच्या सार्वभौमत्वाला, देशाच्या परराष्ट्र धोरणाला, देशातील सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या अशा कुठल्याही माहिती, व्हिडिओ किंवा तत्सम समाजमाध्यमी चॅनेलवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे. या कारवाईमध्ये या चॅनेल्सवर बंदी घालण्याची तरतुदसुद्धा आहे याचनुसार ही कारवाई केली गेली आहे. भारतविरोधी मजकूर पसरवणाऱ्या सर्वच सोशल मीडिया चॅनेलवर आता कारवाईची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे भारताची जाणूनबुजून बदनामी हाच ज्या चॅनल्सचा हेतू आहे त्या चॅनेल्सवर आता सरकरचो करडी नजर असणार आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0