संजय राऊतांची बोलती बंद! दोन मिनिटांत आटोपली पत्रकार परिषद

    06-Jul-2022
Total Views |
 
 
raut
 
 
मुंबई : रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या बोलघेवड्या संजय राऊतांची पत्रकार परिषद अवघ्या दोन मिनिटांत आटोपली. महविकास आघाडीचा किल्ला लढवण्याचा एकहाती विडा उचलणाऱ्या संजय राऊतांची पत्रकार परिषद अवघ्या दोन मिनिटांत कशी काय संपली ? याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या आमदारांच्या गटाने जेव्हा उठाव केला तेव्हा त्यांनी संजय राऊतांच्या वाचाळपणाबद्दलच जोरदार टीका केली होती. या आमदारांना जर एवढाच त्रास होत असेल तर मी बोलणे बंद करतो अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी त्यावेळी दिली होती.
 
 
याच संजय राऊतांनी जेव्हा हा आमदारांचा उठाव झाला तेव्हा या आमदारांबद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली होती, गेले अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही त्यांचे निर्णय रौताच सगळीकडे सांगत फिरत होते पण महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत फडणवीस - शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून राऊतांची जणू दातखीळच बसली आहे. या पत्रकार परिषदेतही फक्त भावना गवळींबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देत परिषद आटोपती घेतली. शिंदे गट सत्तेत आल्यापासून राऊतांनी त्यांचे बोलणे जास्तच मनावर घेतले आहे असे दिसतंय.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.